चक्रीवादळ,पूर,भूकंप,अतिवृष्टी,गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये शासनाकडून मदत दिली जात असते. सन २०२२-२०२३ ते २०२५-२०२६ या कालावधीमध्ये जर अशी मदत देय होत असेल तर आता त्या रकमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग तर्फे दिनांक २७,मार्च २०२३ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
सदर शासन निर्णय पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करावे.