Spread the love

पूर्वी चाळीसगाव तालुक्यात आपली सेवा देणार व नुकतेच स्वजिल्ह्यात बदली होऊन गेलेले श्री मनोज शिरसाठ अप्पा यांचे काल दिनांक ०८ सप्टेंबर,२०२० रोजी दुख:द निधन झाले आहे. मनोज शिरसाठ आप्पांच्या अकाली जाण्याने जळगाव जिल्ह्यातील सर्व तलाठी संवर्गावर शोककळा पसरली आहे. जळगाव जिल्हा तलाठी संघाचे सचिव श्री जनार्दन बंगाळे भाऊसाहेब यांनी आपल्या भावना पुढील शब्दात व्यक्त केल्या आहेत.

अंत्यत लोभस असे व्यक्तिमत्त्व…. श्री.मनोज शिरसाठ आप्पासाहेब….
फेसबुकवर बातमी वाचूनच धक्का बसला कि मनोजच्या बाबतीत असे घडूच कसे शकते…. म्हणून एका मित्राला फोन केला तर तिकडून भावूक आवाज आला कि भाउ मनोज गेला….
मनोज जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होता. आत्ताच मागील काही दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात त्याची बदली झाली होती. मित्राला स्वतःच्या जिल्ह्यात जाण्याचा खुपच आनंद होता… भाउ आता कुटुंबाला वेळ देता येइल… असे त्याने बोलुन दाखवले होते.
परंतु शासकीय कर्तव्य बजावत असतानाच कोरोनाची लागण झाली आणि मनोजचा दुर्दैवी अंत झाला.
दिवसभरात किती तरी वेळा मनोजचा हसा चेहरा वारंवार डोळ्यासमोर येतो आहे.
मित्रा खुपच वाईट झाले.तुझी उणीव कधीही भरून निघाणार नाही….
भावपूर्ण श्रद्धांजली… 😔💐

मनोज शिरसाठ आप्पांना तलाठी मित्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐