जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात दिनांक 21 मे,2020 चे सकाळी 06.00 वाजेपासून दिनांक 04 मे , 2020 चे रात्री 12.00 वाजे पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) (3) लागू करण्यात आले आहे.कोरोना संसर्गाची तसेच नजीकच्या काळात येणारे धार्मिक सण,उत्सव,थोर पुरूषांचे जयंती इ.चे पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व सार्वजनिक शांतातेचा भंग होऊ नये म्हणून सदर आदेश जारी करण्यात आलेले आहेत.
या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न समारंभाच्या मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे मा. अपर जिल्हादंडाधिकारी रविंद्र भारदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
आदेश दिनांक 20 मे, 2020