Spread the love

शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच, अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस / त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकुण २ जणांकरीता “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.त्याबाबत दिनांक १९ एप्रिल,२०२३ रोजी कृषि,प.सं.दु.व्य. विकास व मत्स्य व्यवसाय विभाग,महाराष्ट्र शासन या विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

सदर योजनेअंतर्गत पात्रतेसाठी

१) रस्ता/रेल्वे अपघात

२) पाण्यात बुडून मृत्यू

३) जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा

४) विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात.

५) वीज पडून मृत्यू

६) खून

७) उंचावरुन पडून झालेला अपघात

८) सर्पदंश व विंचुदंश

९) नक्षलाईटकडून झालेल्या हत्या

१०) जनावरांच्या खाल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी/ मृत्यू

११) बाळंतपणातील मृत्यू

१२) दंगल

१३) अन्य कोणतेही अपघात, या अपघातांचा समावेश असेल.

सदर योजनेतील  काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे 

सदर योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले १ सदस्यांमध्ये

आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल.

कृषि गणनेनुसार निर्धारित केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी व

वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य

असे एकुण २ जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान लाभ अनुज्ञेय असतील:

सदर योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले १ सदस्यांमध्ये

आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल.

 गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत खालील लाभ अनुज्ञेय असतील:

अपघाताची बाब-                            आर्थिक सहाय्य

          १) अपघाती मृत्यू-                 रुपये २,००,०००/

         २) अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे –        रुपये २,००,०००/

      ३) अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे-                    रुपये २,००,०००/

         ४) अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे-              रुपये १,००,०००/

सदर योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसांच्या २४ तासांसाठी ही योजना लागू राहील. या कालावधीत वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य यापैकी कोणत्याही व्यक्तिला केंव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहतील.

तसेच योजनेमध्ये १) नैसर्गिक मृत्यू २) विमा कालावधीपुर्वीचे अपंगत्व ३) आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे ४) गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात ५) अंमली पदार्थाच्या अमलाखाली असतांना झालेला अपघात ६) भ्रमिष्टपणा ७) शरीरातर्गत रक्तस्त्राव ८) मोटार शर्यतीतील अपघात ९) युध्द १०) सैन्यातील नोकरी ११) जवळच्या लाभधारकाकडून खून याबाबींचा समावेश असणार नाही.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभ प्राप्त अर्जासोबत

खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे :

१) ७/१२ उतारा

२) मृत्यूचा दाखला

३) शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.

४) शेतक-याच्या वयाच्या पडताळणी करीता शाळा सोडल्याचा दाखला / आधारकार्ड / निवडणूक ओळखपत्र.

    ज्या कागदपत्राआधारे ओळख/वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे.

५) प्रथम माहिती अहवाल / स्थळ पंचनामा / पोलीस पाटील माहिती अहवाल

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी शासन निर्णय पहा

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा

सानुग्रह अनुदान योजना